सोलापूर विभागातील 51 एस.टी. कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सांगोला एसटी आगारातील 5 कर्मचाऱ्यांचा समावेश, 25 जणांचे निलंबन

Spread the love

सांगोला / नाना हालंगडे
विविध मागण्यांसाठी राज्यभरात सुरू असलेल्या एस. टी. कामगारांच्या आंदोलनाला संपवण्याचा जोरदार प्रयत्न एसटी महामंडळ व राज्य सरकारकडून होताना दिसत आहे. सोलापूर विभागातील तब्बल 51 एस.टी. कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशीरा हा आदेश काढण्यात आला. या बदल्यांमध्ये सांगोल्यातील 5 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारीच सांगोला आगारातील 25 जणांचे निलंबन करण्यात आले होते.

कृती समितीच्या आदेशाने 28 ऑक्टोबरपासून दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. त्यानंतर माघार घेतल्याने 4 नोव्हेंबरपासून राज्यभर विलिनीकरणासाठी हा संप करण्यात आला. पण राज्यभरातील 45 कर्मचाऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. त्यामुळे 45 दिवसाचा दुखवठा म्हणून कामबंद आंदोलन सुरू असून, त्यामुळे प्रशासनाने सोलापूर विभागातील 51 जणांच्या बदल्याया, सांगोला आगारातील 25 जणांचे निलंबन व 5 जणांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

बदली आदेश

 

बदली आदेश

राज्य शासनाने पगारवाढ करून कामबंद आंदोलन मागे घेण्यास सांगितले आहे. पण कामगार आपले 45 सहकारी गेल्याने दुःखवठा म्हणून 45 दिवस कामावर नाहीत. प्रशासनाने मात्र राज्यभर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अशातच सोलापूर विभागातही कारवाई सुरू आहे. काल रात्रीपर्यंत 51 जणांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या तर सांगोला आगारातील 25 जणांचे निलंबन अन् 5 जणांच्या बदल्या करण्यात आलेला आहेत. या कामबंद आंदोलनास आत्ता 34 दिवस झाले असून,11 दिवस हे आंदोलन सुरू राहणार आहे.

शेतकरी कामगार पक्ष हा कामगारांचा पक्ष आहे. त्यामुळे मी सर्व ताकतीनिशी तुमच्या पाठीशी आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. इथून पुढे कोणावर कारवाईही होवू देणार नाही. वेळप्रसंगी आम्हीही रस्तावर उतरू. तुम्हा सर्वांना न्यायचं मिळवून देऊ.- भाई डॉ. बाबासाहेब देशमुख (शेकाप नेते, सांगोला)

राज्य सरकारने आम्हाला अत्यावश्यक सेवेत सामावून घेतले नाही. त्यामुळे आमच्यावर मेस्मा कायदा लागू होत नाही. आम्ही दुखवटा पाळत आहोत. सरकारने आमच्या मागण्यांचा तातडीने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. (एक निलंबित कर्मचारी)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका