सांगोल्यात 200 एसटी कर्मचाऱ्यांची वज्रमूठ

कामावर रुजू न होण्याची घेतली शपथ

Spread the love
  • सांगोल्यात 200 एसटी कर्मचाऱ्यांची वज्रमूठ
  • कामावर रुजू न होण्याची घेतली शपथ
  • एसटी सेवा पूर्ण ठप्प होण्याची चिन्हे

सांगोला / नाना हालंगडे
राज्यभर एसटीची सेवा अजूनही पूर्वपदावर नाही. ज्या आगारात ही सेवा सुरू केली तेथेही कर्मचारी सेवा बंद करण्यासाठी एक होत आहेत. असाच प्रकार सांगोल्यातही पहावयास मिळाला. या आगारातील दोनशे कर्मचाऱ्यांनी एकत्र येत, शपथा घेत कोणीही कामावर जायचे नाही, असा पावित्रा घेतला आहे. त्यामुळे आता सांगोला आगारातील बस सेवा बंदच होणार आहे.


राज्यातील आगाराबरोबर सांगोला आगारही संपात सक्रिय सहभागी झाले असून कालपासून सुरू झालेल्या एसटी सेवेला आता खीळ बसणार आहे. आगारात 320 कर्मचारी असून दोन दिवसापासून 36 अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत आहेत. अश्यातच प्रशासनाने 29 जणांचे निलंबन आणि 9 जणांच्या विभागा अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे.

या कामबंद आंदोलनाला 34 दिवस उलटले आहेत. राज्यभरातील 45 कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनादरम्यान जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे 45 दिवसाचा दुःखवठा म्हणून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

आज मंगळवार 7 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता या आगारातील 200 कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शपथा घेत हा संप अजून 20 डिसेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे असे सांगितले.

कोणी ही कामावर यायचे नाही. कामगार एकजुतीचा विजय असो, असाच नारा दिला.

सरकारचे निलंबन अस्त्र
राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली. त्यामुळे कामावर हजर राहा असे सांगितले. तरीपण सांगोला आगारातील कर्मचारी हजर राहत नाहीत. त्यामुळे आज मंगळवार 7 डिसेंबर रोजी आणखी चारजणांना निलंबित केले आहे. काल एसटी सेवा सुरू केली अन् सांगोला आगाराला 5 हजार 869 रूपये इतके उत्पन्नही मिळाले.

  • आकडे बोलतात
    काल धावलेल्या बसची संख्या : 3
    एकूण किलोमिटर : 279
    एकूण फेऱ्या : 13
    एकूण खर्च :16 हजार रूपये
    एकूण उत्पन्न : 5 हजार 869 रू.

राज्यभर एसटी कामगार विलीनीकरनाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. अशातच सरकारने पगारवाढ केल्याने संप मागे घ्या असे सांगितले आहे. पण त्यामुळे आमचे 45 कामगारानी जीवनयात्रा संपविली,त्यामुळे आम्ही दुखवटा म्हणून कामबंद आंदोलन 45 दिवस ठेवले आहे, असे ते सांगत आहेत. कालपर्यंत राज्यातील दोन हजाराच्या आसपास आगारे सुरू झाली असून, सांगोला आगारही काल सोमवार 6 डिसेंबर सुरू झाले आहे.

काल आगारातून सोलापूर, जत व आटपाडी या तीन मार्गावर एसटी बसेस धावल्या. एकूण 13 फेऱ्यातून या एसटी 279 किलोमिटर इतक्या धावल्या. यातून आगाराला 5 हजार 869 रूपये इतके उत्पन्नही मिळाले. तर कालचा डिझेल, व कामगारांचा पगार असा 16 हजार रूपये इतका खर्चही आला.

आगारात 320 कर्मचारी असून,अजूनही बरेच कर्मचारी कामावर हजर राहत नाहीत. त्यामुळे प्रशासन कालपर्यंत 25 जणांचे निलंबन तर 9 जणांच्या बदल्या केल्या आहेत. आज पुन्हा 4 जणाचे निलंबन केले आहे. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 29 आज अखेर झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी सोलापूरसाठी सकाळी 8 वाजता बस सोडण्यात आलेली आहे. तर जतला साडे बारा वाजता तसेच आटपाडीला दुपारी 2 वाजता बस सोडण्यात येणार आहे. आज आगारा चालक,वाहक व अन्य असे 36 कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत. अशी माहिती आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी दिली.

राज्य शासनाने पगारवाढ केली आहे. त्यामुळे कामगारांनी कामावर हजर राहावे. कालपासून एसटी सेवा सुरू केली आहे. अजुनही बरेच कामगार कामावर येत नाहीत त्यामुळे आज पुन्हा चार जणांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. हे कारवाई सत्र असेच सुरू राहणार आहे.- पांडुरंग शिकारे (आगार प्रमुख सांगोला)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका