ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

फड सांभाळ तुऱ्याला गं आला

सांगोला तालुक्यात ऊसक्षेत्र वाढले

Spread the love

माणदेशातील दुष्काळी सांगोला तालुका अशी ओळख असली तरी,गेली 2 ते 3 वर्षापासून तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. त्यातच टेंभू,म्हैसाळ,नीरा उजवा कालवा व अन्य योजनांचे पाणी आल्यामुळे तालुका पाणीदार झाला आहे. तर फळबागावर मोठ्या प्रमाणात रोगराई पडत असल्याने,शेतकरी आत्ता ऊस शेतीकडे वळले आहेत.

सांगोला/ डॉ.नाना हालंगडे
फड सांभाळ, तुऱ्याला गं आला
तुझ्या ऊसाला, लागलं कोल्हा

अशी अवस्था सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. तोडणी अभावी ऊसाला मोठ्या प्रमाणात तुरे आले असून 5 हजार क्षेत्र असलेल्या या तालुक्यात साडे तीन हजाराहून अधिक क्षेत्राला तुऱ्याने व्यापले आहे. कधी नव्हे ते उसाचे क्षेत्र वाढले अन् तुऱ्याने उसबागायातदार हैराण झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील, माणदेशातील दुष्काळी सांगोला तालुका अशी काहीशी पूर्वापार ओळख. पण सध्या तरी ही पुसली गेली आहे. कारण गेली तीन-चार वर्षापासून अतिवृष्टी, शेती योजनांचे आलेले पाणी यामुळे तालुका गारेगार झाला आहे. तर याचा विपरीत परिणाम फळबागायतीवर झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आपोआप ऊस पिकाकडे वळलेला आहे.

सध्या सांगोला तालुक्यात 5 हजार हेक्टरवर हे उसाचे क्षेत्र आहे. को 86032, फुले265 व्हीएसआय8005 या जातीचा समावेश आहे. दोन ते तीन वर्षापासून पडणाऱ्या सततच्या पाऊसामुळे तालुक्यातील शेतजमिनी ह्या ओस पडू लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी पडीक ठेवण्याऐवजी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागण केली.

विना झंझट आणि कमी श्रमाने अधिक लोकांचा ओडा याकडे वळला आहे. पण सध्या तालुक्यातील ऊसाला तोड मिळत नसल्याने अनेकांचे ऊस रानात तुरे येवून डोलू लागले आहेत.

ऊसाला मोठ्या प्रमाणात तुरे आल्यामुळे उसाचे वजन ही घटत आहे. सांगोला तालुक्यात या वर्षीच साखर कारखाना सुरू झाला आहे. पण अनेकांच्या उसाच्या नोंदी यांच्याकडे नाहीत. त्यामुळे तालुक्यातील 4 हजार हेक्तरच्या आसपास उसाचे क्षेत्र रानातच पडून आहे. अनेकजण मंगळवेढा, जत आधी ठिकाणी आपला ऊस पाठवीत आहेत. या चार हजार हेक्टर क्षेत्रापैकी 50 टक्के लोकांनी तर ठिबक सिंचनाद्वारे ऊस शेती केली आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे ऊसाचे क्षेत्र वाढू लागले आहे. अनेकांनी ऊस शेतीलाच पसंती ही दिलेली आहे. त्यामुळे नव्याने लागण करण्यासही अनेकजण धडपडत आहेत. येत्या 5 वर्षात संपूर्ण तालुकाभरात हेच ऊसाचे क्षेत्र 50 हजाराहून अधिक हेक्टरवर जाणार असल्याचे, जाणकार मंडळी सांगत आहेत. आता ऊसाला लवकर तोड मिळत नसल्याने ऊसबागायतदार शेतकरी डोक्याला हात लावून बसलेला आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालावे,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

5 हजार हेक्टर क्षेत्र
सांगोला तालुक्यात सध्यस्थितीला 4 हजार हेक्टरवर ऊसाचे क्षेत्र आहे. यामध्ये को 86032, नीरा 8600,फुले265 व व्हींएसआय 8005 या जातींचा समावेश आहे. पण सध्या या ऊसाना तोडी आल्या नसल्याने हा तूऱ्याने डोलू लागला आहे. सांगोला तालुक्यात एकच साखर कारखाना आहे,त्यांच्याकडे या उसाच्या नोंदीही नाहीत,त्यामुळे हा ऊस रानात असाच राहत आहे.

ऊसशेती फायदेशीर
माणदेशातील दुष्काळी सांगोला तालुका अशी ओळख असली तरी,गेली 2 ते 3 वर्षापासून तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. त्यातच टेंभू,म्हैसाळ,नीरा उजवा कालवा व अन्य योजनांचे पाणी आल्यामुळे तालुका पाणीदार झाला आहे. तर फळबागावर मोठ्या प्रमाणात रोगराई पडत असल्याने,शेतकरी आत्ता ऊस शेतीकडे वळले आहेत.

गेली दोन वर्षापासून पाऊसमांन चांगला पडत असल्याने, शेतजमिनीत कोणतेच पीक येत नव्हते. त्यामुळे ऊस लागवडीचा निर्णय मी घेतलेला आहे. यासाठी मी नीरा 8600 या जातीचे बेणे मी आणलेले आहे. सध्या एक एकरासाठी 2 टन ऊस आणलेला आहे. याची नव्याने लागण करणार आहे. – सोपान भंडे, शेतकरी, वाढेगाव

तूऱ्यामुळे वजनात घट
तालुक्यात ऊसाची लागण शेतकऱ्यांनी मागील 9 ते 10 महिन्यापूर्वी केलेली आहे. अनेकांचे हे क्षेत्र 2 ते 5 एकरापर्यंत आहे. पण या ऊसाला तोडी येत नसल्याने सध्या हे तूऱ्यात आले आहे. यामुळे वजनात मोठी घट होत आहे. तर कोणी पशुपालकही हे ऊस जनावरांसाठी नेत नाही. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. केवळ वेळेत तोडणी होत नसल्याने वजनात घट होत आहे.

हेही वाचा

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका