अजनाळेत ग्रामपंचायतीचा अक्षम्य हलगर्जीपणा

लाखो रुपयांचे जलशुद्धीकरण यंत्र बासनात

Spread the love

जलशुद्धीकरण यंत्र बसवले. कौतुक सोहळे झाले. श्रेय घेण्यात आले. मात्र नंतर या यंत्राकडे दुर्लक्ष करून हा संच अडगळीत टाकण्यात आला. जनतेच्या पैशाचा हा अपव्यय आहे. ग्रामपंचायतीने तातडीने याची तात्काळ दखल घेऊन जलशुद्धीकरण यंत्राला पाणीपुरवठा करावा. – समाधान धांडोरे (तालुकाध्यक्ष-नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस)

अजनाळे : सचिन धांडोरे
शासन, प्रशासन हे जनतेच्या पैशावर चालत असते. योजना, नेत्यांचा खर्च सुध्दा जनतेच्या पैशातून होत असतो. जनतेच्या पैशातून मंजूर झालेल्या योजनेची केवळ उदासीनतेमुळे कशी वाट लागू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून अजनाळेतील या प्रकाराकडे पाहता येईल.

अजनाळे गावाला शुद्ध पाणीपुरवठा मिळावा या हेतूने समाज कल्याण सभापती संगिताताई धांडोरे यांनी समाज कल्याण विभागातून लाखो रू.खर्च करुन गावात तिन ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्र बसवले. परंतु अजनाळे ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे हे जल शुद्धीकरण यंत्र पाण्याविना बंद अवस्थेत असून त्यामुळे हे जलशुद्धीकरण यंत्र असून अडचण नसून खोळंबा अशी दयनीय अवस्था जलशुद्धीकरण यंत्राची झाली आहे.

अडगळीत पडलेले जलशुध्दीकरण यंत्र.

तरी ग्रामपंचायतीने याची तात्काळ दखल घेऊन जलशुद्धीकरण यंत्राला पाणीपुरवठा करावा अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे तालुका अध्यक्ष समाधान धांडोरे यांनी केली आहे.

सुजाता ताई देशमुख यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडल्यानंतर यांनी प्रथम गावात विकास कामांचा धडाका लावला. परंतु अवघ्या काही महिन्यातच विकासकामांची गती कमी झाल्याचे पहावयास मिळाले. ग्रामपंचायतीचे योग्य नियोजन व कर्मचाऱ्यावर वचक नसल्यामुळे जलशुद्धीकरण यंत्र गेल्या चार महिन्यापासून धूळखात पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. ग्रामपंचायतीने फक्त नावाच्या पाट्या लावून बिले काढून घेण्यापुरतेच हे जलशुद्धीकरण यंत्र बसवले आहेत का? अशी चर्चा गावामध्ये केली जात आहे.

सरपंच उपसरपंच, व सर्व सदस्यांनी पाणीपट्टी वसुली गावातील पाणीपुरवठा बंद करून केली. परंतु जलशुद्धीकरण गेल्या चार ते पाच महिन्यापासून बंद आहे. तरी सुध्दा साधी चौकशीही केली नाही. ग्रामपंचायतीने तात्काळ जलशुद्धीकरण यंत्राला पाणी पुरवठा करावा अशी मागणी गावातुन जोर धरु लागली आहे.

जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आलेल्या ठिकाणी स्वतंत्र पाईपलाईन नसल्यामुळे पाण्याची गैरसोय झाली आहे. याची स्वतंत्र पाईप लाईन करण्यासाठी चालू वर्षाच्या आराखड्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. लवकरच पाईप लाईन पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. – संदीप सरगर (ग्रामविकास अधिकारी)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका