ताजे अपडेट
Trending

डिकसळचा दत्ताही निवडणुकीत आणणार रंगत

जत विधानसभा ; ३३ गावात हटकर समाज विखुरला

Spread the love

चर्चा तर होणारच/ डॉ.नाना हालंगडे
जत विधानसभा निवडणुकीत सांगोला तालुक्यातील डिकसळ गावचे सुपुत्र, उच्चशिक्षित अन् प्रचंड ध्येयशक्ती असलेले, हटकर समाजासाठी राज्यभर झगडणारे मा.श्री. दत्तात्रय शंकर भुसनर यांनी यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून हे यात रंगत आणणार आहेत.

जत तालुक्यातील १२२ गावापैकी ३३ गावात हा हटकर समाज विखुरलेला असून यांची निर्णायक मते यामध्ये रंगत आणणार आहेत. एक मात्र डिसळचा दत्ताभाऊ यात बाजी मारणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. त्यात जत विधानसभा हा मतदार संघ नेहमीच चर्चेत असतो. आताही विद्यमान आमदार अन् भाजपने उमेदवारी दिलेले उमेदवारही निवडून येणारं नाहीत? असा दावा जतवासिय करत आहेत. तर अपक्ष असलेले रवीगौडा पाटील हेच बाजी मारतील अशीही जोरदार चर्चा आहे?

त्यातच सध्या १७ उमेदवारांचे २१ अर्ज असून त्यात डिकसळ गावचे सुपुत्र, उद्योग पती दत्तात्रय भुसनर यांनीही उमेदवारी अर्ज भरीत रंगत वाढविली आहेत. जत तालुक्यातील ३३ गावांमध्ये २० हजारांच्या आसपास या समाजाची मते असून उच्च विद्याविभूषित दत्ताभाऊ ही बाजी मारू शकतील? अशीही चर्चा ऐकावयास मिळत आहेत.?

आजपर्यंत जत तालुक्याला एकही सत्तेतील आमदार मिळालेला नाही. काही अपवाद वगळता सध्याचे विद्यमान आमदाराविषयी कामे न केल्याने रोष आहे. तर आता भाजपने स्थानिकाचा विचार न करता आयात उमेदवार दिल्याने त्यांच्या विषयी ही कमालीचा संताप आहे. त्यात अपक्ष उमेदवारी ठाकलेले रवी पाटलांची उमेदवारी अन् विजय अशीच काहीशी जोरदार चर्चा आहे.

त्यात माजी आम. विलासराव जगतापसह अन्य टीम पाटलांच्या समवेत असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यातच भरीला भर जातीपाती वरून होणारी निवडणूक की चमत्कार करू शकते? हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

कोण आहेत दत्ताभाऊ?
दत्ताभाऊ हे सांगोला तालुक्यातील डिकसळ गावचे सुपुत्र असून, उच्चविद्याविभूषित असे युवक आहेत. त्यांना समाजाविषयी खूपच तळमळ आहे. गरिबी, अज्ञानपण काय असते हे यांनी अनुभवले आहे. आज जरी ते उद्योगपती असले तरी गावाविषयी, समाजाविषयी यांना प्रचंड आत्मीयता आहे. यांचे हे समाजकार्य राज्यभरच आज ही सुरूच आहे. त्यामुळे यांनी समाजाच्या आग्रहाखातर हे जत विधानसभा निवडणुकीचे मैदान लढविण्याचा चंग बांधला आहे.

समाजासाठी कायपण
समाजासाठी राज्यभर दौरे करीत असताना दत्ताभाऊंना अनेक गोष्टी जाणवल्या. आजही आपला समाज राज्यात मोठ्या प्रमाणात असताना साधा एक खासदार अथवा आमदार नाही. हीच मोठी शोकांतिका आहे. दुसऱ्याचीच धूनी कुठेपर्यंत धुवायची? माझा समाज कधी क्रांती करणार? समाजासाठी आहे का एखादे महामंडळ? युवकांनी ,समाज बांधवांनी ह्या साऱ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात.यासाठीच की ही जत विधानसभा निवडणुक अपक्ष लढवीत आहे.आज राज्यभर फिरत असताना अनेक गोष्टी जाणविल्या. समाजासाठी तर ही निकराची लढाई आहेच? पण सर्वांना सामावून घेवून मला सर्वच समाजात क्रांती करावयाची आहे.हार,जीत हा वेगळा विषय आहे.राज्यातील सर्वच पक्षांना एकदा समाजाची ताकत दाखवून देवू,असेही दत्ताभाऊ म्हणाले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका